मंत्रिमंडळ निर्णय : धारुर तालुक्यातील ‘या’ गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन होणार, वाचा.. 

टीम AM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

◾ पुणे – छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

◾ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

◾ शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

◾ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

◾ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

◾ औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

◾ थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ

◾ धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

◾ काटोल, आर्वी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय

◾ पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय

◾ हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

वरिल निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.