घराबाहेर पडू नका ! पुढील चार दिवस राज्यात तीव्र उष्णतेची लाट…!

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…!

टीम AM : राज्यातील हवामानात सध्या मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड उष्णता असे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस राज्यात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

तापमानाचा पारा 44 अंशांवर जाण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढला असून, प्रशासनाने नागरिकांना विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर देखील उष्ण आणि दमट हवामानामुळे उकाडा असह्य होणार आहे. आरोग्य यंत्रणांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here