10 वी -12 वी परीक्षा : थेट होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

टीम AM : राज्यातील दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. 

यामध्ये परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी, विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई, भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन तसंच व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणं, आदी उपायांचा समावेश आहे.