टीम AM : मुंबईसह राज्यभरात सक्रिय झालेल्या मान्सूनला अधिक पोषक वातावरण तयार झाले असून, हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे पुढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोकणातील व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
खान्देश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 10 तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत पुढील 12 दिवस म्हणजे 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.