गुड न्यूज : अंबाजोगाईतून जाणाऱ्या ‘जनकल्याण’ एक्सप्रेसवेला राज्य सरकारची मंजुरी…!

टीम AM : कल्याण – लातूर ‘जनकल्याण’ एक्सप्रेसवेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पावर काम करणार आहे. हा महामार्ग तब्बल 442 किलोमीटर लांबीचा असेल.

कल्याणवरुन लातूरला जायला सध्या 10 – 11 तास लागतात. ‘जनकल्याण’ एक्सप्रेसवेमुळे 4 – 5 तासांमध्ये कल्याणवरुन लातूर गाठता येईल.

कल्याणपासून सुरु होणारा हा महामार्ग मुरबाड, माळशेज घाट, ओतूर – आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंभा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर 17 इंटरचेज असतील. राज्यातले इतर महामार्ग आणि कॉरिडोरलाही हा महामार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 35 हजार कोटींचा खर्च येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here